चीनच्या बेजबाबदारपणामुळे जग संकटात
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiOlUjg-kv03y4l9R5V6eiEDFKGUbMpfIFWyA3WvE23eUpyRb3_AGmnx6p7ePkP4aVhm_IVYtaMJOKqkU6ZFi8UqW8h8aZi5CkVc-Koyp1Etwf7c74pLiDVVlW6L8wLXyObDCOukoRILrg_/s320/cina.jpg)
यापूर्वी चीनमध्ये असे धोकादायक व्हायरस तयार झाले आहेत. त्यापैकी सार्स प्रमुख आहे. गेल्या पन्नास वर्षात, संसर्गामुळे होणारे रोग वेगाने पसरले आहेत. सर्वात मोठी विडंबन म्हणजे प्राणी आणि पक्ष्यांमुळे होणारे आजार सामान्यत: माणसांना त्याच्या जाळ्यात ओढतात. प्राणी आणि पक्ष्यांपासून मानवाला रोगाचा संसर्ग होणे यात काही नवीन नाही पण हवामान बदल आणि खाण्याच्या सवयी, शहरीकरण आणि आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या वाढत्या प्रवृत्तीमुळे होणारे रोगाचे संक्रमण वेगाने पसरू लागले आहे.
अनेक शहरे अनियोजित पद्धतीने विकसित
जगभर शहरी लोकसंख्या वेगाने पसरत आहे. पन्नास वर्षांपूर्वी, जिथे लोकसंख्या 35 टक्के शहरे मध्ये रहात होती, आता ही संख्या 55 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. बहुतेक शहरे अनियोजित पद्धतीने विकसित होत आहेत. ही शहरे झोपडपट्ट्यांनी पूर्णपणे तुडूंब झाली असून जे रोगासाठी पोषक वातावरण ठरत आहेत. आसपासची शेती, जमीनी, जंगले इत्यादीवर शहरे वसवली जात आहेत. माणसाने निसर्गावर अतिक्रमण केल्याने आता याचा परिणाम म्हणून कोल्ह्या, माकड, अस्वलासारख्या वन्यजीवांचे शहरात येणे वाढले आहे. यामुळे, प्राण्यांपासून माणसांमध्ये संसर्ग वाढत आहे आणि नवीन रोग होऊ लागले आहेत. सार्स, स्वाइन फ्लू सारखे आजार या संसर्गाचे परिणाम आहेत.
खाण्याच्या सवयी वेगाने बदलतायत
शहरीकरण, मध्यमवर्गाचा विस्तार, वाढती भरभराट, प्रवासाची आधुनिक माध्यमे यासारख्या घटकांमुळे खाण्याच्या सवयी झपाट्याने बदलत आहेत. येथे चीनचे उदाहरण प्रासंगिक आहे.
कधीच्या काळी डुकराचे मांस फक्त चीनमधील उच्चभ्रू लोकांसाठी होते, पण आज चीनमधील गरीब माणूससुद्धा डुकराचे मांस खात आहे. केवळ चीनच नाही तर संपूर्ण जगात मांसाहार आणि परदेशी अन्नाचा वापर हे स्टेटसशी जोडल्यामुळे त्याचा प्रसार वेगाने होत आहे.
स्वस्तात मांस मिळवणे मानवाला पडले महागात
मांसाहारींच्या वाढत्या प्रवृत्तीमागील कारण म्हणजे मशीन-आधारित पशुपालन. यामध्ये, लहान जागेत हजारो प्राणी एकत्र पाळले जातात. आणि प्राण्यांना पारंपारिक पद्धतीने चारादेण्याऐवजी धान्य, तेलबिया, मांस दिले जाते जेणेकरून त्यांच्याकडून लवकरात लवकर अधिक मांस मिळू शकेल
जैवविविधता संकटात
जनावरांच्या चारासाठी जंगले नष्ट करून मका आणि सोयाबीनची जगभरात लागवड केली जात आहे. ज्यामुळे जैवविविधता धोक्यात आली आहे. शहरीकरण, मांसाहारी, जंगलांचा नाश, आधुनिक जीवनशैली या सर्व गोष्टी हवामान बदलाला उत्तेजन देत आहेत परिणामी, संपूर्ण पर्यावरणीय प्रणाली धोक्यात आली आहे
स्वस्तविक्री धोरणामुळे चीनला समृद्धी
उदारीकरणाच्या युगात स्वस्त विक्री धोरणामुळे चीनने स्वत:ची भरभराट करुन घेतली आणि मध्यमवर्गाचा विस्तार झपाट्याने झाला. या मोठ्याशा मध्यमवर्गीयांच्या खाण्याच्या सवयीसुद्धा वेगळ्या होत्या पण चीनचे मांस-मासे बाजार आधुनिक झाले नाहीत, चीनच्या अरुंद रस्त्यामध्येही जिवंत कोंबडीपासून ते साप, उंदीर, वटवाघूळापर्यंत विक्री सुरू झाली.
चीनमधील वन्यजीवांचा अवैध व्यापार जगभरात वेगात पसरला
चीनच्या नव्या श्रीमंतांनी वन्यजीवनाला त्यांच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग बनवून ठेवले. परिणामी, जगभरातील या असंघटित बाजारपेठांमध्ये बंदी घातलेल्या वन्यजीवांची विक्री उघडपणे सुरू झाली कारण की वन्यजीव व्यवसायात मोठ्या प्रमाणात नफा होता, म्हणूनच, वन्यजीवांचा कायदेशीर व अवैध व्यापार चीनकडून जगभरात वेगाने पसरला.
जागतिक अर्थव्यवस्थेला 40 अब्ज डॉलर्सचा फटका
चीनने मोठ्या नफ्यावरील निर्बंधांकडे दुर्लक्ष करत वन्यजीवांच्या बेकायदेशीर व्यापारास प्रोत्साहन दिले. त्याचे दुष्परिणाम 2003 मध्ये आलेल्या सीवियर एक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम म्हणजेच सार्स रोग वेगाने पसरला, या महामारीने तर केवळ सहा महिन्यांतच जागतिक अर्थव्यवस्थेला 40 अब्ज डॉलर्सचा फटका बसला होता. त्याचवेळी जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिलेला की, जर वन्यजीवांच्या अवैध खरेदी विक्रीवर मनाई आणि खाण्या पिण्याच्या सवयी बदल्या गेल्या नाहीत तर अशा प्रकारचे व्हायरस पुन्हा तयार होऊ शकतात. हे लक्षात घेऊन चीन सरकारने काही काळ रस्त्यावर मांस, मासे आणि वन्यजीवांच्या अवैध व्यापारावर नियंत्रण ठेवले खरे पण जसे सार्सचा उद्रेक संपला तसे लगेचच सर्व काही पूर्वीसारखे चालू ठेवले.
कोरोना विषाणूला केवळ महामारी घोषित करून उपयोग नाही
जगाने याकडे दुर्लक्ष करू नये की चीनचा हा असंघटित-बेकायदेशीर वन्यजीव व्यवसाय आता कोरोना विषाणूच्या माध्यमातून संपूर्ण जगावर विनाश ओढवतो आहे. चीनने ज्या पद्धतीने जगाला संकटात आणले आहे त्याकडे जागतिक समुदाय आणि विशेषतः जागतिक आरोग्य संघटनेने दखल घेतली पाहिजे. कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या या संसर्गजन्य रोगाला केवळ महामारी घोषित करण्यात काहीच अर्थ नाही.
टिप्पणी पोस्ट करा